असं झालं तर किती चांगलं होईल…’, पुण्यातील पहिल्या कोरोनाग्रस्त पती-पत्नीची इच्छा

परदेशातून आलेलं एक संकट एखाद्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतं, याचा विचार काही महिन्यांपूर्वी कोणीही केला नसेल. पण चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतातही धडक दिली आहे. कोरोनाच्या या संकटामुळे देशभर चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे, तर काहींच्या आयुष्यावर थेट परिणाम झाला आहे.पुण्यातीलही एका दाम्पत्याला कोरोनाची लक्षणे आढळल्याने काही दिवसांपूर्वी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र 14 दिवसांच्या उपचारानंतर आता या दाम्पत्याची प्रकृती स्थिर झाली आहे. 9 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले दाम्पत्य आता पूर्ण बरे झाल्याची माहिती पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली आहे.गेल्या 14 दिवसांपासून त्या दाम्पत्यावर उपचार सुरू होते. त्यांनंतर आता केलेली प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला दुबईहून पुण्यात आलेल्या दाम्पत्याला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. संबंधित दाम्पत्यानंतर आणखी तिघांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. 9 मार्चला ही बातमी समोर आल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.

दाम्पत्याची आता आहे ही इच्छा

कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर झालेल्या उपचारानंतर या दाम्पत्याचा प्राथमिक अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता या दाम्पत्याने एक इच्छा बोलून दाखवली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला डिस्चार्ज झाला तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नसेल, असं हे दाम्पत्य सांगत आहे. यादिवशी आम्हाला घरचं जेवण करण्याची इच्छा आहे, असंही ते म्हणाले. मात्र त्यांचा अंतिम अहवाल येणं बाकी असल्याने अद्याप त्यांच्या डिस्चार्जबाबत निर्णय झालेला नाही.

Corona viruse : गावाच्या सीमा बंद

कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरवासीयांनी गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत गावात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या लोकांमळे हा आजार आपल्या गावात पसरू शकतो या भीतीने काही गावांनी आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे सोमवारी सरकारने राज्यात संचारबंदीसह जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जिल्ह्यात अकडून पडलेत. तर, गावकऱ्यांनीही सीमा बंद केल्याने गावातही जाताना अडचण येत आहे. दरम्यान, गावाकडे आलेल्या नागरिकांशी सौजन्यावे वागण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला. सोबतच जिल्ह्यातील सीमाही ऐकमेकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या आहेत.

गावतही सीमाबंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून कळमनुरी तालुक्यातील नांदापूरच्या गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.

१ करोड लोकसंख्या असलेला देश आपले डॉक्टर पाठवणार इटलीला

Corona : Lockdown

कोरोना…लॉक डाउन…अफवा आणि सत्य!

सदर लेख जरा मोठा वाटेल…पण आपण सर्व घरीच आहात तर जरा लक्ष देऊन वाचा!

कोरोना हा व्हायरस तसा फार जुना…म्हणजे 12 वी च्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे की आपल्याला एरवी होणारे सर्दी पडस हे दोन विषाणू मुळे होतात, एक ऱ्हाइनो व्हायरस व दुसरा कोरोना व्हायरस… मग आज पर्यंत सामान्य असलेला हा विषाणू इतका घातक कसा झाला? आणि त्याबद्दल जगाची वैद्यकीय परिस्थिती काय आहे? चला जाणून घेऊ…

प्रत्येक जीवाश्मप्रमाणे विषाणूची देखील उत्पत्ती( evolution/ mutation) होत जाते. आता जगात थैमान घातलेला covid – 19 हा त्या उत्पत्ती च्या चौथ्या साखळीतला आहे! ह्या आधी कोरोनाच्या तीन साखळ्या आपल्याला माहीत होत्या, ज्या सौम्य स्वरूपाच्या होत्या आणि anti viral vaccine देऊन आपण त्याला बरं देखील करत होतो. मात्र आता उदभवलेली साखळी ही पूर्णपणे वेगळी व शक्तीशाली आहे, त्याचे स्वरूप ( structure) सध्या तरी जिवशास्त्रज्ञांना माहीत नाही! कोणत्याही व्हायरल आजाराची जेव्हा लस आपल्याला दिली जाते तेव्हा त्यात तोच व्हायरस मृत अवस्थेत आपल्या शरीरात inject केला जातो… जेणेकरुन तो मृत व्हायरस शरीरातील जिवंत व्हायरसची सर्व शक्ती निकामी करून आपल्या प्रतिकार शक्तीला हातभार लावते! आता ह्या व्हायरस वर औषध बनवण्यासाठी सर्वात मोठी अडचण म्हणजे ह्या व्हायरसचे स्वरूपच सध्या आपल्याला माहीत नाही कारण हा पूर्णतः नव्या जोमाचा आहे आणि जुन्या व्हायरस पेक्षा वेगळा आहे. त्यात भर म्हणून ह्याच्या प्रसाराचा वेग हा अतिशय तीव्र आहे… म्हणून हा रोग जगाला त्रासदायक ठरत आहे. शास्त्रज्ञांना ह्या रोगावर आज जरी उपाय सापडला तरी अनेक वेगळे वेगळे टेस्ट करत मानवाच्या वापरासाठी युक्त व्हायला अजून एक वर्ष किमान लागेल! त्यामुळे सद्यस्थितीत आपण केवळ ह्याच संक्रमण रोखू शकतो एवढंच. मागच्या काही दिवसात भारतात अनेक रुग्ण बरे देखील झाले… मात्र तो परत त्यांना उदभवणार नाही याची खात्री नाही! त्यामुळे त्या रुग्णांना सक्तीने quarantine व्हायला सांगितले आहे!

वैद्यकीय पैलू पाहिल्यानंतर आपण आता प्रशासनिक उपाययोजना बघूया!

देशात व राज्यात लॉक डाऊन करण्यात आलेले आहे! पंतप्रधानांनी जनता कर्फ्यु चे आवाहन केले… ह्या मागचे हेतू आपण तपासून पाहूया…

जनता कर्फ्यु वेळी अनेक अफवांना उधाण आले. त्यातून भारतीय जनता अजूनही शिक्षित अडाणी असल्याचे उघड झाले! अवकाशातून फवारणी, 12 तास व्हायरसचे जीवन असते, ओमकार व शंख नाद हा व्हायरस ला मारून टाकतो अश्या अनेक अफवा दिवसभर सोशल मीडिया वर फिरत होत्या, ह्यातली एकही बाब खरी नाही!

जनता कर्फ्यु हा मुळात ह्या साठी आवाहन करण्यात आले होते की लोकांना आणि प्रशासनाला अंदाज यावा की भविष्यात जेव्हा काही दिवसात आणीबाणी येऊ घातली आहे त्यावेळी आपण पुढचे काही आठवडे घरात बंदिस्त राहू शकतो का? एकप्रकारे हा जनता कर्फ्यु म्हणजे भविष्यातील आणीबाणीची रंगीत तालीम होती!! आता वळूयात लॉक डाउन कडे…
राज्यात व देशात लॉक डाऊन का केलं आहे? तर ह्याच कारण असं आहे की जगभरात ज्या देशांमध्ये हा आजार फोफावला त्यात एक गोष्ट समान होती ती म्हणजे आजाराची सुरुवात झाल्यापासून 30 दिवसानंतर पुढच्या आठवड्यात ह्या रोगाचा अचानक पणे गुणाकार होत गेला! आधी एक एक ने वाढलेले रुग्ण आता दोन, चार, आठ, सोळा अश्या पटीने वाढत गेले… भारतात कोरोनाला 30 मार्च रोजी एक महिना पूर्ण होत आहे! त्यापुढच्या आठवड्यात जी आणीबाणी येऊ घातली आहे त्यासाठी सर्व प्रशासनिक यंत्रणा ह्या मोकळ्या असाव्यात, तत्पर असाव्यात व त्यांची ऊर्जा इतर ठिकाणी खर्ची जाऊ नये म्हणून सर्व जनतेला घरात बंदिस्त होण्याचे आदेश देण्यात आले! ज्यावेळी हा रोग फोफावेल तेव्हा त्या रुग्णांना नेणाऱ्या अम्ब्युलन्स कुठेही अडकू नये म्हणून रस्ते मोकळे करण्यात येत आहेत! त्या वाढलेल्या रुग्णांचा इतरांशी संपर्क रस्त्यात येऊ नये म्हणून सगळ्यांना घरी बसवण्यात येत आहे! प्रशासन कोणतीही गोष्ट उघड पणे जाहीर करणार नाही! तुम्ही घाबरून जाऊ नये म्हणून… मात्र सुज्ञ नागरिकांना त म्हणता तपेल कळलं पाहिजे! उद्या जेव्हा हा रोग फोफावेल आणि तुम्ही रस्त्यावर फिरत असाल, पोलीस यंत्रणा तुमच्यात गुंतलेली असेल, अधिकारी त्यात गुंग असतील तर मग ह्या परिस्थितीवर नियंत्रण कोण मिळवणार? रविवारी केलेला शंखनाद हा 30 मार्च पासून कोरोनासोबत सुरू होणाऱ्या युद्धाचा बिगुल होता!! आणि हे प्रतीक होतं की आम्ही तयार आहोत! आम्ही आमच्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या आणि प्रशासनाच्या पाठीशी आहोत!! तू हे…तू येणारच…आम्ही पण तयार असणारच!

अफवांना बळी पडू नका! रस्त्यावर बाहेर निघू नका! यंत्रणेवर ताण देऊ नका! निरोगी रहा जिवंत रहा! 🙏🙏🙏🙏

Corona virus : आता या देशात २ हून अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यावर बंदी ,खुद्द राष्ट्रप्रमुख गेले एकांतवासातआता

बर्लिन – करोना व्हायरस ने साऱ्या जगात थैमान घातले आहे तर ….या व्हायरस ने आतापर्यंत जगात हजारो लोकांचा जीव घेतला आहे . तर लाखो लोकांना या व्हायरस ची लागण झाली आहे . त्या मुळे कारोना व्हायरस चा प्रसार रोखण्यासाठी जर्मनीने देशात घातलेले निर्बंध अधिक कठोर केले आहेत. या महामारी ला रोखण्यासाठी जर्मनीने 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्रित येण्यावर बंधन घातले आहेत. BBÇ ने रविवारी जर्मनीच्या च्यांसलार एंजेला मार्केल यांच्या हवाल्याने म्हटले आहे ,की ” आपला व्याहरच संक्रमण रोकण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे ” जर्मनीने घातलेल्या नव्या प्रतिबंध मध्ये ब्युटी – पार्लर ,मसाज पार्लर आदी. बंद आहे .याशिवाय इतर काही आवश्यक नसलेली दुकाने याआधीच बंद केली आहेत.

मर्केल यांच्या संबोधनानंतर ,काही वेळातच एकांतवासात जाणार आहेत,त्या शुक्रवारी एका डॉक्टरच्या संपर्कात आल्या होत्या .त्यांना अँटी न्युमोनियाचे इंजेक्शन देणाऱ्या डॉक्टरांचा कोरोणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .त्यामुळे त्यांनी एकांतवास घ्यायचा निर्णय घेतला आहे .

जर्मनीत आतापर्यंत 55 जणांचा मृत्यू

एकांतवास गेलेल्या मर्केल यांची काही दिवस नियमित पणे तपासणी होईल.याकाळात त्या घरूनच सगळी कामे करतील .युरोपातील सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था मानल्या जाणाऱ्या जर्मनीत आता पर्यंत 18,610 जणांना कोरोना ची लागण झाली आहे .त्यापैकी 55 जणांचा मृत्यू झाला आहे.

188 देश कोरोनाच्या कवेत

21 शतकात जग एका भयानक संकटातून जात आहे . कोरोना ने 188 देश्याना कवेत घेतले असून मृतांचा आकडा वाढतच आहे .जगभरात कोरोना ग्रस्तांचा आकडा 3.5 लाखांवर गेला असून 15408 जणांचा मृत्यू झाला आहे .

सर्वाधिक मृतांची संख्या इटली मध्ये

एकट्या इटली मध्ये मृतांची संख्या 5 हजारावर आहे.महत्वाचे म्हणजे ज्या चीन मध्ये ह्या व्हायरस छा जन्म झाला तिथे फक्त सव्वा तीन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.